Wednesday, July 25, 2018

भगवंत मंदिर, बार्शी।


 सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीची एक धार्मिक क्षेत्र म्हणून ओळख आहे. भगवंत मंदिर .

 कशास काशी, गया,
अयोध्या जावे रामेश्वरी...
असता श्रीहरी आमुचे घरी...

 असं बार्शीच्या भगवंताचं  आणि  त्याच्या महतीच वर्णन केलं जातं.

बार्शी या नावाची उत्पत्ती होण्याची अनेक करणे सांगितली जातात. पूर्वी या गावात बारा तीर्थे होती. बारा शिवमंदिरे असल्याचा उल्लेखही पुराणात आढळतो. त्यावरून बारा शिव, बारा बारस, बारशी आणि सध्या बार्शी असं नाव प्रचलित आहे.

भगवंत हा कोणत्याही नामाभिधानाशिवाय इथं स्वयंभू स्थापित आहे. गंडकी शिळेची शाळीग्राम मूर्ती पाहताक्षणीच विलोभनीय आणि लोभस वाटतं. भगवान श्री विष्णूंनी लक्ष्मीसह वास्तव्य केलेलं हे भगवंताचं मंदिर आहे.

भगवंताच्या मंदिराला पेशवेकालीन इतिहास दरवर्षी आषाढी, कार्तिकी आणि माघी एकादशीला भगवंत मंदिर भक्तांच्या गर्दीने फुलून जातं.

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचं हे एक महत्वाचं ठिकाण आहे. उत्सव मूर्तीची ही नगरप्रदक्षिणा म्हणजे बार्शी शहरासह पंचक्रोशीचा जणू लोकोत्सवच असतो. यासाठी खास सजवलेल्या रथातून भगवंताची उत्सव मूर्ती हजारो भाविकांना पाहायला मिळते. मंदिरात दररोज काकडा आरती, महापूजा, धुपारती आणि शेजारती पार पडतात.

या मंदिरासाठी 1760 मध्ये नानासाहेब पेशव्यांनी, 1823 साली ईस्ट इंडिया कंपनीने आणि ब्रिटिशांनी 1874 मध्ये सनदा देऊ केल्या. अंतिम सनदेनुसार सध्याचा मंदीराचा कारभार चालतो. मंदिराची व्यवस्था देवस्थान पंच कमेटी पाहते. तर पूजा-अर्चा नित्योपचार बडवे मंडळी करतात. 'सर्व धर्म समभाव' असं देवस्थान एखाद्या गावाला जसा कारभारी म्हणून सरपंच असतो तसाच या मंदिराच्या प्रमुखाला सरपंच म्हणून ओळखलं जातं.

पूर्वीपासून कालांतराने आवश्यक ते बदल मंदिराच्या बांधणीत आणि जीर्णोद्धारात होत आले आहेत. त्यामुळे मोठ्या तिर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त व्हावा, अशी मंदिर समिती आणि भाविकांची अपेक्षा आहे.

बार्शीचं भगवंत मंदिर पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराशी साधर्म्य साधणारं आहे. केवळ मंदीराची रचनाच नव्हे तर अध्यात्मिक महत्वही पंढरीशी साधर्म्य साधणारं आहे. भक्त पुंडलिकाने जसा विठू भूलोकी आणला तसा राजा अंबरीषाने विष्णूला पृथ्वीतलावर यायला भाग पाडलं.

पंढरीच्या मंदिरासारखंच सोळाखांबी मंदीर आणि गरुड खांब मंदीराचं अध्यात्मिक आणि प्राचीन महत्व अधोरेखित करतात. पंढरपूरला जाणारा वारकरी हा भगवंताचा निस्सीम भक्त आहे. एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन द्वादशीला भगवंत दर्शनाने उपवास सोडायचा, अशी वारकऱ्यांची परंपरा आहे.

देवाच्या अंगावर भक्ताची मूर्ती असलेलं एकमेव मंदिर भगवंतांनी घेतलेल्या दशावताराची शिल्पे मंदिराच्या शिखरावर कोरली आहेत.

भक्तांच्या रक्षणासाठी पृथ्वीवर अवतरलेल्या भगवंताची मूर्ती गंडकी शिळेच्या गुळगुळीत काळ्या पाषाणाची आहे. गर्भगृहातील ही मूर्ती विलक्षण दिसते. हातात शंख, चक्र, गदा आणि उजव्या हाताखाली भक्त शिरोमणी अंबरीश राजाची मूर्ती आहे. देवाच्या अंगावर भक्ताची मूर्ती स्थापित असलेलं हे देशातलं एकमेव मंदिर आहे. देवाच्या पाठीशी लक्ष्मीची मूर्ती मुखवट्याच्या रूपात अस्तित्वात आहे. भगवंताच्या मस्तकावर शिवलिंग आहे. छातीवर भृगुऋषींच्या पावलांची खूण आहे. 1245 च्या सुमारास या मंदिराची उभारणी झाली, असं सांगितलं जातं.

हेमाडपंथी बांधकाम शैलीच्या या मंदिराच्या गाभाऱ्यासमोर गरुडखांब आहे. भगवंताच्या दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक गरुडखांबाला प्रेमाने आणि श्रद्धेने आलिंगन देतो. नक्षिदार कलाकुसर असलेला मंदीराचा सभामंडप सुमारे दोनशे वर्षांपूर्वींचा असावा, असा अभ्यासकांचा कयास आहे. मंदिरात दत्त महाराज, विठ्ठल रुख्मिणी, जोगा परमानंद, गणपती आणि काही पुरातण मूर्तीचे भग्न अवशेष पाहायला मिळतात. धार्मिक आणि अध्यात्मिक महात्म्य लाभलेल्या भगवंतांच्या दर्शनाची आस प्रत्येक भाविकाला असते.


श्री भगवंतांची अख्यायिका बार्शीच्या भगवंताची ख्याती जेवढी मोठी आहे, तेवढीच या क्षेत्राची अख्यायिका रंजक आहे. राजा अंबरीष नावाचा तपस्वी बार्शी पुण्य नगरीत वास्तव्याला होता. पुराणकाळात या अंबरीषाने अंगिरस ऋषींनी केलेल्या यज्ञात सहभाग घेऊन विद्वता आणि लोकप्रियता मिळवली. 12 वर्षे घोर तपस्या केल्याने त्याला भगवंताचे दिव्यज्ञान प्राप्त झाले. नारदमुनींच्या सांगण्यावरून त्याने साधनद्वादशीचं व्रत अंगिकारल. त्याच्या या कठोर साधनेमुळे इंद्राचे सिंहासन डळमळीत झाले. अशी आख्यायिका आहे. इंद्रदेवाने दुर्वास ऋषींना अंबरीषाची साधना भंग करण्यासाठी पाठवले. अतिथी सत्कारात दोष शोधून दुर्वास ऋषींनी अंबरीषाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळणार नाही, असा शाप दिला. ऋषींनी क्रोधाने आपटलेल्या जटांमधून  एका दैत्याचा जन्म झाला. दैत्यापासून अंबरीषाचे रक्षण करण्यासाठी भगवंताने सुदर्शन चक्र सोडलं आणि दैत्याचा संहार झाला. ऋषींनी अंबरीषाची क्षमा मागितल्यावर सुदर्शन शांत झाले आणि बार्शीतल्या उत्तरेश्वर मंदिरात विसावले, अशी अख्यायिका आहे.



टीप : यातील बरीचशी माहिती संकलित आहे। मजकुरात बदल होऊ शकतो।सदरचे लेखन माझे नाही।


Thursday, July 12, 2018

चारमिनार, हैदराबाद।

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

             चारमिनार, हैदराबाद
========+++==++=============

          चारमीनार एक स्मारक आणि एक मशिद आहे, जो हैदराबाद, भारत इतिहासाशी संबंधित आहे. ही भव्य रचना 15 9 1 सीई मध्ये पूर्ण झाली आणि केवळ हैदराबादची एक ऐतिहासिक इमारत नाही तर भारताचे एक प्रसिद्ध स्मारक देखील आहे. असे समजले जाते की, कुतुब शाही वंशवंताचे पाचवे सुल्तान असलेल्या मोहम्मद कुली कुतुब शाही यांनी त्या जागेवर अंत्यसंस्कार करण्याचे स्मारक बांधले होते जे नंतर शहराला पकडले होते. हे मूसी नदीच्या काठावर स्थित आहे. चारमिनार चार टावर म्हणजे चार आणि मिनार आहेत. कुतुब शाह घराण्यातील मीर मोमिन अस्ताबादी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आणि त्यांनी डिझाईन आणि लेआऊटसाठी व्यापक तयारी करण्याचे आदेश दिले. इतिहासकारांचा असा विश्वास आहे की ही रचना, इंडो-इस्लामिक आर्किटेक्चरसाठी काही फारसी घटकांच्या एकत्रिकरणासाठी एक उदाहरण आहे. हे स्मारक जुन्या शहराच्या मध्यभागी स्थित आहे आणि असे मानले जाते की प्रशासकीय कारणास्तव हैदराबादच्या चारमिनारवरून चार दरवाजांची मोजमाप करण्यात आली. या भव्य आणि राजेशापी केंद्रस्थळाला भेट दिल्याशिवाय हैदराबादची भेट अपूर्ण आहे. याला पूर्वच्या आर्च दे ट्रायम्फे असेही म्हटले जाते. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की ते आपल्या पत्नी भाग्यमथी यांच्या सन्मानार्थ बांधले गेले होते.



एक आख्यायिका देखील आहे जी एक गोलकांडा येथे किल्ल्याला जोडणारा स्मारक म्हणून एका गुप्त बोगद्याचे अस्तित्व सांगते जे आणीबाणीच्या काळात शाही कुटुंबाला पळून जाण्याचे साधन होते. प्रत्येक बाजूला 20 मीटर्स मोजते तर मिनेरेट जमिनीपासून 48.7 मीटर्सच्या उंचीवर स्थित आहेत. चारमीनारच्या प्रत्येक बाजूला एक चौकासारखी इमारत उघडली जाते जेथे मोठ्या खांबाला मुख्य रस्त्यांकडे दुर्लक्ष केले जाते. हे एक स्पष्ट चौरस रचना आहे जे 31.9 5 एमट्स मोजते. प्रत्येक बाजूला कमानी उभारताना 11 मीटर उंचीचे अंतर ठेवले जाते. चार मिनारेट्सची उंची 56 मीटर उंच आहे. मिनरेट्सवरील शोभेच्या कमानें सौंदर्याचा मूल्य वाढवतात. प्रत्येक मीनार आत 14 9 परिपत्रक पायर्या आहेत आणि त्यातील एक पर्यटक पर्यटकांच्या चढ-उताराने आणि शहराच्या चित्तथरारक दृश्याचा आनंद घेण्यासाठी खुले आहे. हे हैदराबादमध्ये सर्वात जुनी मस्जिद आणि उपासनेसाठी उपासनेसाठी प्रार्थनास्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. त्या काळातील इस्लामिक वास्तुकला कमानी, मिनरेट्स आणि डोंबांनी व्यापलेले आहे. रचना आपल्या भव्य स्टुको सजावट आणि प्रभावी balustrades आणि balconies च्या व्यवस्था प्रसिद्ध आहे. फुलांचा आराखडा नाजूक पद्धतीने अंमलात आणला जातो आणि स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या मुगल आणि हिंदू स्थापत्यशास्त्रातील मिश्रणाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून उभा आहे. 188 9 मध्ये चार मुख्य दरवाजे चार दरवाजे जोडण्यात आल्या. चारमीनारच्या मध्यावर एक पाण्याचे टाके असून त्यात मशिनमध्ये विश्वासू प्रार्थना करण्याच्या आधी, अंघोळीसाठी लहान झरा आहे. हैदराबादच्या जुन्या शहराच्या संस्कृतीशी चारमीनार समानार्थी बनले आहे आणि मुस्लीम पदार्थ, रंगीबेरंगी बांगडया, मोती, ज्वेलरी आणि इतर वस्तूंना चिकटून राहण्यासाठी हे क्षेत्र लोकप्रिय आहे. हे ठिकाण हैद्राबादच्या संस्कृतीचे प्रतीक आहे आणि उज्ज्वल काळातील स्मरणोत्सव म्हणून अभिमानाची गोष्ट आहे.
🙏🙏 *साभार* 🙏🙏
*www.telanganatourism.gov.in*
*फक्त भटकंती समूहातील मित्रांना माहितीसाठी*
🥗🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙

🐋🐋🐋🐳🐳🐳

Tuesday, July 3, 2018

नाथ मंदिर, पैठण

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

                    नाथ मंदिर, पैठण।

===============================

                               हे श्री एकनाथमहाराजांचे देवघर असून येथील मुख्य मूर्ती श्री विजयी पांडुरंगाची आहे. नाथांची कुलस्वामिनी एकविरा देवीसह अनेक देवतांच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत. आषाढी वारीसाठी पंढरीस जाणाऱ्या एकनाथ महाराजांच्या पादुका येथेच आहेत.







                   श्रीखंड्‍याने ज्या रांजणात पाणी भरले तो रांजण, ज्यावर चंदन घासले ती सहाण, ज्यात श्रीकृष्ण गुप्त झाले तो उद्धव खांब येथे आहे. नाथमहाराज ज्या खांबास टेकुन प्रवचन करीत तो पुराणखांबही येथेच आहे. भगवान दत्तात्रेयांनी जेथे उभे राहून चोपदारकी केली ते स्थानही येथे दाखविण्यात येते. एकनाथषष्ठी उत्सवातल्या तीनही दिंड्या ह्या ठिकाणाहून निघतात. त्याचप्रमाणे आषाढीचा पालखी सोहळाही या ठिकाणाहून निघतो. प्रत्येक एकादशीस येथे महापूजा (अभिषेक) करण्यात येते. गोकुळ अष्टमीचा (कृष्ण जन्माष्टमीचा) उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे इतरही पारंपारिक, नैमित्तिक उत्सव येथे साजरे केले जातात. मंदिर परिसरात नाथवंशीयांची घरे आहेत.
           तसेच मंदिर परिसरात पैठणी साड्यांची दुकाने आहेत। खूप कमी किमतीत असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत। नक्की एकतरी घ्यावी।

🐋🐋🐋🐳🐳🐳

Monday, July 2, 2018

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर गावाची माहिती

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

*उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर  गावाची माहिती*

===============================

           मराठवाड्यातील उस्मानाबाद शहरापासून २३ किलोमीटरवर असलेले तेर गाव ऐतिहासिक महत्त्वाचे आहे. तेरणा नदीच्या काठावर वसलेल्या तेरचे धार्मिक, सामाजिक व व्यापारीदृष्ट्याही महत्त्वाचे स्थान आहे. तेरचा उल्लेख करताच समोर येते ते संत गोरा कुंभार यांचे नाव. गोरोबा काकांची समाधी तेरणा नदीच्या उत्तर तीरावर आहे. दरवर्षी चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येथे मोठी यात्रा भरते.

तेरमधील जैन मंदीरे, बौद्ध स्तुप, त्रिविक्रम मंदिर, उत्तरेश्वर मंदिर, रामेश्वराचे मंदिर व पुरातत्व वस्तू संग्रहालय प्रसिद्ध आहेत. 'पेरीण्लस ऑफ दी एरिथ्रयन सी' या ग्रंथाचे लेखक ग्रीक देशातील खलाशी होते.या ग्रंथातील ५१ व्या प्रकरणामध्ये तेर गावाचा उल्लेख दक्षिण पंचायतीतील महत्त्वपूर्ण व्यापारी केंद्र असा करण्यात आला आहे.बॅरिगाझा (गुजरात राज्यातील भडोच शहर) पासून दक्षिणेस २० दिवसांच्या प्रवासानंतर गाठता येणारे गाव तगर म्हणजेच आजचे तेर.तगर हे शहर असून तेथे पूर्वेस दहा दिवस प्रवास केल्यानंतर पोहोचता येते. तगर येथून साधे कपडे, विविध तर्‍हेची मलमल आणि गोणपाट बॅरीगाझा येथे पाठविली जातात. त्याचप्रमाणे समुद्र किनारपट्टीच्या प्रदेशात तगरला येणारा माल बॅरीगाझा येथे पाठविला जातो, असे तेरचे वर्णन या ग्रंथात आढळते. तेरचे नाव काही प्राचीन ग्रंथात तगर, तगरपूर, तगरनगर असे आहे. संस्कृत भाषेत तेर या नगराचा 'तगरम्‌'असा उल्लेख आहे. पुराणात याला 'सत्यपुरी'असे म्हटले आहे.

प्राचीनकाळी तेर हे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. तेर हे पैठण, नेवासे, जुन्नर या व्यापारी केंद्राशी जोडलेले होते. भारतीय वाङ्मयात तेरचे व्यापार व कलाशिल्प नगरी असे वर्णन आहे. सातवाहन राजांच्या काळात तेरचा युरोपमधील ग्रीस व रोम या देशाशी व्यापारी संबंध होता. तेर येथील उत्खननात सातवाहनकालीन नाणी सापडली आहेत.

१६ शतकांचे साक्षीदार असलेल्या त्रिविक्रम मंदिराने तेरच्या वैभवात आणखीन भर टाकली आहे. त्रिविक्रम मंदिर हे बौद्धकालीन असल्याचे मत काही संशोधकांनी व इतिहास तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्रिविक्रम मंदिर हे चौथ्या शतकातील असावे, असे मत इतिहास संशोधक पर्सी ब्राऊन यांचे आहे. आजही तेर व आसपासच्या परिसरात उत्तरेश्वर, कालेश्वर या हिंदू मंदिराबरोबर जैन मंदिरे आहेत.

कालेश्वरचे मंदिर हे राष्ट्रकुटांच्या काळातील असून त्याचे शिखर दाक्षिणात्य (द्रविड) शैलीचे आहे.हे मंदिर विटांनी बांधलेले आहे.मंदिरासमोरील मंडप हा अलीकडच्या काळातील असून कमानी इस्लाम शैलीच्या आहेत. मंदिराच्या गर्भग्रहात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. या मंदिराच्या मूळ भिंती ढासळू नयेत म्हणून चुन्यात बसविलेल्या भिंती बांधण्यात आलेल्या आहेत.

त्रिपुराकेश्वर मंदिर हे तेरणा नदीच्या पात्रात दगडांचा वापर करून बांधलेले आहे. गर्भगृहामध्ये शिवलिंग व त्याच्यासमोर बाहेर मंदिर आहे. हे मंदिर मध्ययुगीन चालुक्य शैलीत आहे. उत्तरेश्वर मंदिर हे माती व लाकडाने बांधण्यात आलेले आहे. यात दगडाचा वापर केलेला नाही. हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्यात शिवलिंग आहे. या मंदिराचे प्रवेशद्वार लाकडाचे असून त्यावरील कोरीव काम उठावदार आहे.मंदिर इसवी सनाच्या ७ व्या शतकातील आहे. सध्या मंदिरात शिवलिंग असून आसपास सूर्य, विष्णू, भैरव आणि विरगळ दिसतात. सूर्य मूर्तीखाली सातघोडे व सूर्याच्या दोन्ही बाजूस कमलधारी स्त्रिया आहेत. देवळाजवळील एका दगडावर कमळाभोवती १२ राशींची चिन्हे आहेत।

तेरच्या पश्चिमेस नागठाण म्हणून एक वास्तू आहे. ही वास्तू दगडाने बांधलेली असून गर्भग्रहाच्या भिंतीत एक शिल्पयुक्त फरशी आहे. त्या शिल्पात चैत्य व त्यावर नागवृक्ष दाखविलेला आहे. त्याचबरोबर खुद्द पार्श्वनाथ वस्ती ही एक चार दालनाची इमारत असून त्यात पार्शवनाथ, महावीर व चामरधारींच्या मूर्ती आहेत.जिनवीसहित सापडलेल्या लेखानुसार या जैन मंदिराचा काल इसवी सन १४ ते १६ वे शतक असा आहे. अगदी अलीकडच्या काळातील नृसिंह व रामेश्वरांची मंदिर येथे आहे.नृसिंहाचे मंदिर गावच्या आग्नेयेस अर्ध्या मैलावर असून ते विटांनी बांधलेले आहे. गावठाणाच्या रामेश्वराच्या मंदिरात शिवाचे मंदिर आहे.

तेर येथे संत गोरोबा कुंभार यांची समाधी आहे. संत गोरोबा कुंभार यांना तत्कालीन संत नामदेव, ज्ञानदेव हे आदराने काका म्हणून संबोधित. दरवर्षी गोरोबा काकांची पालखी येथून पंढरपूरला जाते. कै. रामलिंगप्पा खंडाप्पा लामतुरे व त्यांचे चिरंजीव भागवतप्पा लामतुरे यांनी पुरातन वस्तुचे संग्रह केल्यामुळे तेरची ख्याती झालेली आहे. कै. रामलिंगप्पा यांनी छंद म्हणून तेर व परिसरात सापडलेल्या जुन्या वस्तुंचा संग्रह करण्यास सुरुवात केली. या वस्तूंमध्ये जुनी नाणी, मातीच्या मुर्ती, हस्तीदंताच्या मुर्ती, शंखाच्या बांगडा, दगड व मातीचे विविध आकाराचे मणी, अलंकार, रोमन बनावटीचे दिवे, कर्णभूषणे यांचा संग्रह आहे. हा संग्रह इतिहास व संशोधकांच्या दृष्टीने मोलाचा आहे.

रामलिंगांप्पा यांनी सन १९६१-१९६२ साली हा संग्रह विनामुल्य महाराष्ट्र शासनाला दिला. १९६७ साली शासनाने ५ हजार वस्तू असलेला हा संग्रह घेण्याचा निर्णय केला हा दुर्मिळ वस्तुसंग्रह एका छोटा इमारतीत संचलित असून पुरातत्व विभागातर्फे याची व्यवस्था पाहिली जाते. या संग्रहालयात हस्तीदंताची स्त्रीमुर्ती विशेष लक्ष वेधून घेते.शंखापासून निर्मित बांगडा, मणी, बौद्ध धर्मियांची धार्मिक चिन्हे आहेत. या व्यतिरिक्त देवदेवतांच्या मुर्ती, दिवे, व धातूची नाणी यांचा संग्रह आहे.गावच्या तेरणा नदीच्या तीरावर कोट टेकडी, साहोरे टेकडी, मुलानी टेकडी तर उत्तर तीरावर सुलेमान टेकडी, रेणुका टेकडी, सुतार टेकडी आहेत. या टेकडींच्या खाली तेरचा इतिहास दडला आहे.
संत गोरोबा काका मंदिर, तेर।

श्री कालेश्वर मंदिर।हे मंदिर गोरोबा काका यांच्या मंदिराला चिकटूनच आहे।



त्रिविक्रम मंदिर,तेर। पहिले बळीराजा मंदिर।


गोरोबा काका कालीन पाण्यावर तरंगणारी वीट।

मुस्तफा हे मला वीट भेट देताना।






तेर हे सात वाहनाच्या काळात व्यापारी व कला केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. तर गुप्त, चालुक्य यांच्या काळात धार्मिक वास्तु व मंदिर निर्मितीसाठीही महत्त्वाचे होते. यादव काळापर्यंत येथे मंदिराची निर्मिती होती. संत गोरोबाकाकांच्या समाधी शेजारी एक दगडी घाट बांधलेला आहे. भाविकांची सोय व्हावी म्हणून पूल वजा कोल्हापूरी बंधारा बांधलेला आहे. इतिहासाचे साक्षीदार असलेले तेर ऐतिहासिक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित व्हावे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे


आंतर जालातून साभार।

🐋🐋🐋🐳🐳🐳