Sunday, February 24, 2019

गरम पाण्याचे कुंड, उन्हेरे।

             गरम पाण्याचे कुंड, उन्हेरे।

पृथ्वीवर असणाऱ्या अनेक चमत्कारां पैकी एक चमत्कार म्हणजे गरम पाण्याची कुंडे किंवा झरे। यांनाच उन्हेरे म्हणतात। आणखी इतरही नावे आहेत। पृथ्वी च्या पोटात घडणाऱ्या प्रक्रियांमुळे हे पाणी गरम होते। जमिनीत च्या वर येते। यालाच इंग्रजी मध्ये हॉट स्प्रिंग असे म्हणतात। अशी उन्हेरे नेहमी ज्वालामुखीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात आढळतात। कारण पावसाचे पाणी जमिनीत मुरले की ते गरम होते। तसेच काही पाण्याची वाफ पण होते। मग हे पाणी खडकामध्ये असलेल्या फटीतून बाहेर येते। या पाण्यात अनेक खनिजे तोपर्यंत मिसळली जातात। बहुदा जास्त प्रमाणात गन्धक असते। असे हे पाणी औषधी पाणी होते। या पाण्यात आंघोळ केल्यास त्वचा रोग बरे होतात, ते याच कारणामुळे।
            आपल्या देशात एकूण 340 ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत। महाराष्ट्रात 28 ठिकाणी हे झरे असल्याची नोंद मी अंतर जालातून घेतली आहे। त्यापैकी 1. अकलोली 2. उनकेश्वर 3. उनपदेव 4.उन्हेरे 5.गणेशपुरी 6.खेड 7.तुरळ 8.देवनवरी 9. राजवाडा 10. राजापूर 11.वज्रेश्वरी 12.सव 13. सातीवली 14.सूनपदेव 15.पाली ही मी मिळवली आहेत।
          दीपावलीच्या सुट्टीत अष्टविनायक दर्शन झाले। शेवटचा गणपती पालीचा होता। मुक्काम पाली येथे भक्त निवास मध्ये केला होता। झोपतानाच सकाळची आंघोळ उन्हेरेला करायची असे ठरवले होते।
          सकाळी 7:30ला पालीचे भक्त निवास सोडले। जायच्या आगोदर दात घासुन घेतले होते, पण आंघोळ केली नव्हती । आंघोळ सरळ कुंडातच करण्याचा विचार होता। झालेही तसेच । 15 मिनिटात कुंडाजवळ उभा होतो। गाडी पार्किंगला लावली। आवश्यक वस्तू टॉवेल, बनियन वगैरे घेऊन कुंडाजवळ गेलो।सरळ कुंडातच उतरलो। पाणी चांगलेच गरम होते।पण हिवाळा असल्याने जाणीव झाली नाही।जवळजवळ एक तास कुंडातच बसून होतो। खूप खूप आनंदी, समाधानी व फ्रेश वाटले।
          या ठिकाणी एकूण तीन कुंड आहेत। दोन बंदीस्त केलेली आहेत। त्या दोन पैकी एक महिलांच्या साठी तर दुसरे पुरुषांच्या साठी आहे। या दोन कुंडातील पाणी आंघोळ साठी आवश्यक तेवढे गरम आहे। पण तिसऱ्या कुंडातील पाणी जास्त गरम आहे। बंदिस्त दोन कुंडात लाकडी फळ्या टाकल्या आहेत। त्यामुळे त्यात उभा राहून अंघोळ करता येते। तर तिसऱ्या कुंडात लोखंडी जाळी टाकली आहे। मी मात्र तिसऱ्या कुंडातच उतरलो। पाणी जास्त गरम असले तरी। माझ्याबरोबर माझा मुलगा अथर्व हाही त्याच कुंडात होता, हे विशेष।
        याठिकाणी अंघोळ करताना साबण, शाम्पू लावणे टाळावे।तसेच चुळा या पाण्याने भरू नयेत। या पाण्यात पोहू नये।  तसेच हे पाणी पिऊ नये। या ठिकाणी पाळीव प्राणी नेऊ नयेत। ही काळजी आपण स्वतः हुन घेतलेली बरी असे मला वाटते।





Sunday, February 10, 2019

तुळशी वृंदावन बाग, पंढरपूर।

खूप दिवसांनी पोस्ट लिहीत आहे। साडीच्या व्यवसाय मुळे कदाचित जमत नसेल । असो आजपासून आरंभ......
       आज मुलाची परीक्षा सिद्धेवाडी ता पंढरपूर येथे होती। कधी नाही ते वेळेचे गणित आज चुकले। 11:00 वाजता परीक्षा होती। पण रस्ता खराब व वेळेचे नियोजन चुकीचे झाल्याने मी पोचलो 11:30 ला ....!  तो पर्यंत सौची बडबड चालूच...! मग मुलाने कसाबसा पेपर दिला। मी मात्र हायसे झालो। हुश्श... तो पण आणि मी पण .....👍
        मग निघालो पंढरपूर कडे। भटकंती चे मन काही स्वस्थ बसेना। काय पहावे। हाच विचार मनात येत होता। बरेचदा येथे येऊन गेलो त्यामुळे सर्व काही पाहून झाले होते। पण आता मला खुणावत होती ती तुळशी वृंदावन बाग...!!!
      नुकतेच 25 जानेवारीला या बागेचे उद्घाटन थाटात संपन्न झाले होते। मग गाडीचे स्टेरिंग सरळ बागेपाशी जाऊन थांबले।
           मुख्य रस्त्यापर्यंत पेविंग ब्लॉक्स होते। हे पाहून आत नक्की कोरीव काम असणार हे मी जाणले। आत जाताना कंपौडच्या दोन्ही बाजू अतिशय सुंदर रंगवलेल्या दिसल्या। त्यावर वेगवेगळे पक्षी , प्राणी होते। मुले ते पाहून खूप खुश झाली। आत गेल्यावर मात्र मन निराश झाले। बागेची वेळ सकाळी 6 ते 9 व संध्याकाळी 6 ते 9:30 आहे असे समजले। तरीपण मी बाहेरून संपूर्ण बाग पाहून घेतली। या बागेला दोन गेट आहेत। पहिले गेट मधून आत गेल्यावर दुसरे बागेसाठी आहे। तिथे सुंदर कोरीव काम केले आहे। असे वाटते जणू काही प्रत्यक्ष स्वर्गात च आहे। त्या गेटच्या दोन्ही बाजूला दोन रूम आहेत। एक तिकीट विक्री साठी व दुसरी गार्ड साठी। आत पाहताच दर्शन होते, ज्ञानेश्वर माऊली चे..! खूपच आकर्षक घडण आहे । मग इतर पण मुर्त्या आहेत, पण बाग बंद असलेने पाहता आल्या नाहीत। एक मूर्ती पण विशेष लक्ष वेधून घेत होती। ती होती... पांडुरंगाची!!! ही मूर्ती 24 फूट उंचीची आहे। जशी मुख्य मंदिरात आहे तशी...! किंबहुना अधिक सरस। विठ्ठल मूर्ती च्या तिन्ही बाजूंनी पालखी सोहळ्याचे चित्र कोरण्यात आहे। समोरील बाजूस एक महिला वारकरी तुळशीपात्र डोक्यावर घेऊन उभी आहे असे दाखवण्यात आले आहे। इतर वारकरी बाजूस उभे आहेत। हे सर्व फायबरचे आहे।तसेच या वृंदावनात संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ ...आदी संतांच्या संगमरवरी मुर्त्या आहेत। जगात एकूण 24 प्रकारच्या तुळस आहेत। त्यापैकी 8 प्रकारच्या तुळस येथे आहेत। तसेच विविध प्रकारच्या फुलांची झाडे पण आहेत। उल्लेखनीय बाब म्हणजे येथे मधोमध कारंजे पण आहेत। सोलापूर वनविभागाने नमामि चंद्रभागा कार्यक्रमांतर्गत पंढरपूर येथील यमाई तलावाच्या परिसरातील २ हेक्टर जागेत तुळशी वृंदावन वनउद्योन तयार केले आहे।
          पंढरपूर ला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सन 1874 मध्ये येथील ओढ्याला बंधारा घातला। आणि हाच तो यमाई तलाव...!!!! या बंधाऱ्यामुळे 196 एकर पाणीसाठा उपलब्ध झाला। मग येथले पाणी लोखंडी पाईप मधीन सायफन पद्धतीने नेले जात होते। पुढील काळात भीमा नदीवरून पाणीपुरवठा सुरू झाला व ही योजना बंद झाली। हा दुर्लक्ष झालेला तलाव आता नावारूपाला आला....!!!