Monday, November 15, 2021

दांडेली अभयारण्य माहिती

 ......दांडेली अभयारण्य.......

===========================



          दांडेली वन्यजीव अभयारण्य कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नडा जिल्ह्यामध्ये असून ८६६.४१ चौ.कि.मी.क्षेत्रफळ असलेले हे अभयारण्य कर्नाटक राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे अभयारण्य आहे.

शांत आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या या अभयारण्यात अनेक दुर्मिळ प्रजातीचे वन्यजीव आणि वनराई पाहायला मिळते.दांडेली अभयारण्य धारवाड पासून ५५ कि.मी. हुबळी पासून ७३ कि.मी. तर बेळगाव पासून ८९ कि.मी.अंतरावर आहे.

काली नदीच्या तीरावर दांडेली नावाचे दुमदार शहरवजा गाव वसलेले असून याच गावाच्या नावावरून अभयारण्यास दांडेली हे नाव पडले आहे.

या अभयारण्यामध्ये वाघ,बिबटे,काळे चित्ते,हत्ती,गवा असे अनेक वन्य प्राणी मोठ्या संख्येने पाहायला मिळतात.

दांडेली अभयारण्याचा प्रदेश सोळाव्या शतकात कित्तूर ची राणी चन्नमा हिच्या ताब्यात होता.ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम आखली तेंव्हा त्यांनी दांडेली,कारवार हा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला होता.सन १० मे १९५६ रोजी दांडेली चा परिसर दांडेली अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलातर दांडेली अभयारण्य २००७ मध्ये संरक्षित व्याघ्र प्रकल्प(Tiger reserve) म्हणून घोषित करण्यात आले.शेजारी असलेले अंशी वन्यजीव अभयारण्य व शेजारील गोवा राज्यातील महावीर अभयारण्य ही दोन्ही अभयारण्ये दांडेली अभयारण्याशी जोडली गेली.कर्नाटक शासनाने २०१५ मध्ये अधिकृतरीत्या दांडेली अभयारण्याला संरक्षित हत्ती रिजर्व(Elephant reserave) म्हणून घोषित केले. 

काली नदी आणि तिची उपनदी नागजीरी नदी या दोन नद्या दांडेली अभयारण्यातील पाण्याचे मुख्य स्त्रोत आहेत.

दांडेली अभयारण्य वन्यप्राण्यांच्या बाबतीत संपन्न आहे.इथे आढळणारी वन्यप्राण्यांची विविधता भारतातील फार कमी अभयारण्यामध्ये पाहायला मिळते.पश्चिम घाटामध्ये हे अभयारण्य असल्याने वन्यप्राण्यांना नैसर्गिक अधिवास  मिळतो.

S@chin 👍

दांडेली अभयारण्या मध्ये हरणाचे काही प्रकार,गवा,अस्वल,उडणारी शेकरू खार,वाघ,बिबट्या,काळा बिबट्या,हत्ती,माकडाच्या प्रजाती तसेच सरपटनाऱ्या जीवांमध्ये अजगर,किंग कोब्रा,मण्यार,धामण,घोणस,मलबार पिट वायपर तसेच इतर विषारी व बिनविषारी सर्प आढळतात.त्याच बरोबर मगरी,सुसरी,घोरपड इत्यादी सरपटणारे जीव या अभयारण्यात आढळतात.

दांडेली अभयारण्य पक्षी निरीक्षणासाठी आदर्श मानले जाते कारण या अभयारण्यात २०० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतात.भारतातील प्रमुख पक्षी निरीक्षण क्षेत्रात दांडेली अभयारण्याचा समावेश होतो.

दांडेली अभयारण्यात सफारी करणे हा अभयारण्य जवळून अनुभवण्याचा प्रकार आहे.जे पर्यटक दांडेली ला जातात ते अभयारण्य सफारी जरूर करतात.सफारी मुळे वन्यप्राणी व वनस्पतींची जवळून ओळख होते.

वेळ:
सकाळी ५.३० ते सकाळी ९.००

दुपारी ३.३० ते सायंकाळी ७.००

शुल्क:

४५० रुपये प्रति माणशी (भारतीय पर्यटक)

१२०० रुपये प्रति माणशी (विदेशी पर्यटक)

दांडेली अभयारण्या पासून १४ कि.मी.अंतरावरील कुलगी नेचर कॅम्प पर्यटक आवर्जून पाहतात,कारण या ठिकाणी एक संग्रहालय असून त्यामध्ये दांडेली अभयारण्या बाबतची सर्व माहिती प्रदर्शित केली आहे.तसेच या अभयारण्यात १३ फुट लांबीचा नागराज (किंग कोब्रा) जो या परिसरात मृत अवस्थेत सापडला,तो जतन करून ठेवला आहे.या कॅम्प मध्ये तंबू मध्ये मुक्काम करण्याची सोय उपलब्ध आहे.

दांडेली अभयारण्यामध्ये ३१ कि.मी.आत घनदाट जंगलात असलेल्या कनारी नदीच्या पात्रात पाण्याच्या प्रवाहामुळे व क्षरणा मुळे ३०० फुट उंचीची खडकाची विशीष्ट प्रकारची रचना तयार झाली आहे.या चित्रविचित्र दिसणाऱ्या रचनेस मोनोलीथिक रचना असेही म्हणतात.सिंथेरा नावाच्या ब्रिटीश महिलेने या संरचनेचा शोध लावल्याने तिचे नाव देण्यात आले.या स्थळापर्यंत वाहन जाते व १० ते १५ मिनिटे पायी चालावे लागते.

जर तुम्ही दांडेली अभयारण्य सफारी करण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल? तर तुम्हाला सांगतो की,ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी दांडेली अभयारण्यामध्ये सफारी करण्यासाठी उत्तम असतो.या काळात वन्य प्राण्यांचे दर्शन होण्याची शक्यता जास्त असते,तसेच वातावरण सुखद असते व जंगल हिरवेगार असते.पावसाळ्यामध्ये हे अभयारण्य सफारीसाठी बंद असते.


मोठ्या संख्येने पर्यटक या अभयारण्याला भेट देण्यासाठी येतात.जंगलाच्या वातावरणात राहण्यासाठी अनेक हॉटेल्स,लॉज व रिसोर्ट उपलब्ध असून लो-बजेट पासून हाय-बजेट पर्यंत सर्व सोयी सुविधांनी युक्त अशी आहेत.तसेच काही रिसोर्ट तंबूवजा खोल्या उपलब्ध करते ज्यामध्ये सर्व सोयी असतात.माहिती साठी दांडेली मधील काही हॉटेल्स/रिसोर्ट पुढीलप्रमाणे


👉दांडेली क्रोकोडाईल एज होम स्टे


👉 दांडेली जंग


👉 दांडेली स्टे श्री


👉 दांडेली विसल्स वूड


+919902474761 अधिक माहितीसाठी या नंबरवर फोन करू शकता... 





Monday, April 13, 2020

विश्वरूप भगवान विष्णू यांची 64 फूट उंच मूर्ती

 विश्वरूप भगवान विष्णू यांची 64 फूट उंच मूर्ती।
================================

     आज निवांत बातम्या वाचत बसलो होतो। त्यावेळी विश्वरूप भगवान विष्णू यांच्या अदभूत मूर्ती विषयी माहिती मिळाली। मग लागलो आंतरजालात शोधायला।




             एक स्वप्न माणसाला काय करायला लावतं, त्याच्या मूर्तीमंत उदाहरण म्हणजे बेंगलोरची 64 फूट लांबीची मूर्ती होय। भगवान विष्णूंची बेंगलोर मध्ये एकशे आठ फूट उंचीची मूर्ती मी स्थापित करीन,असे स्वप्न तिथल्याच एका रिटायर झालेल्या सरकारी डॉक्टरांनी बघितलेलं होतं। ही गोष्ट आहे सन 2013 सालची।
                   मग प्रश्न तयार झाला अशी उंच मूर्ती कोण तयार करणार? याचे उत्तर मिळाले तमिळनाडू मधील तिरुवन्नामलाई जिल्ह्यात। पण ही मूर्ती 108 फूट उंचीची न होता 64 फूट उंचीची झाली। ही मूर्ती पूर्ण व्हायला डिसेंबर2018 हे साल उजाडले।
               या मूर्तीत भगवान विष्णूंच्या एकूण अकरा अवतारांना दाखवलेलं आहे। या मूर्तीत भगवान विष्णूंना 22 हात दाखवलेले आहेत। तसेच डोक्यावर सात फनांच्या रुपात शेषनाग दाखवलेले आहेत। ही मूर्ती बनवायला कारागिरांना अथक परिश्रमाने पाच वर्षे लागली आहे। या मूर्तीचे वजन तीनशे टन आहे।
               सगळ्यात अवघड बाब म्हणजे ही मूर्ती तिरुवन्नामलाई येथून बेंगलोरला पोहोच करणे होय।यासाठी मुंबईहून 240 टायर असलेले ट्रक मागवण्यात आलेला होता। सगळ्यात अवघड काम म्हणजे ही मूर्ती तयार केल्यानंतर त्या संबंधित ट्रकवर ठेवणे होय।तिरुवन्नामलाई ते बेंगलोर हे अंतर कमीत कमी दोनशे दहा किलोमीटर आहे। तरीसुद्धा ही मूर्ती बेंगलोरला पोचण्यासाठी कमीत कमी पन्नास दिवस लागतील । एवढं किचकट आणि अवघड काम आहे।


                  त्यानंतर मूर्ती काढताना अजून एक समस्या उभी राहीली। जिथून मूर्ती काढायची होती, तिथं भरपूर माती होती आणि नुकताच पाऊस पडलेला होता। त्यामुळे सर्वत्र चिखलाचं साम्राज्य होते। हा ट्रक तिथपर्यंत गेला परंतु तीन दिवसात फक्त तो तीनशे मीटर पुढे सरकला। ह्या तीन दिवसात त्याचे अनेक टायर्स बदलावे लागले।परंतु हे का मुंबईच्या संस्‍थेने हार न मानता चिकाटीने पूर्ण केले। हे काम मुंबईच्या रेशमा सिंग वाहतूक संस्थेने घेतलेले होते । या संस्थेची एकूण 30 ते 40 माणसं अहोरात्र झटत होती।





                  ही मूर्ती बेंगलोर मध्ये यायला सात महिने लागले । अनेकांच्या मते इतकी अवाढव्य मूर्ती येणे शक्यच नव्हते। परंतु मंदिर प्रशासनाने हार मानली नव्हती। ही मूर्ती आणण्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्याला मोठे करण्यात आले। काही ठिकाणी रस्ते नव्याने करण्यात आले। एकूण अंतर तीनशे किलोमीटर होते। सात महिन्याचा कालावधी धरला असता, रोज एक किलोमीटर पेक्षाही कमी अंतर ट्रकने कापले । शेवटचे 400 मीटर पार करण्यासाठी तर पाच दिवस लागले। या 400 मीटर अंतरातील 35 विजेच्या खांबांना इतरत्र हलवले गेले। तीन घरे तोडण्यात आली । काही ठिकाणी रस्ते मोठे करण्यात आले। अनेक ठिकाणी फुटपाथ बदलण्यात आले। शेवटी ही मुर्ती आपल्या मंदिरात पोहोचली।
                  त्यानंतरही हे काम संपलेले नाही । ही मूर्ती स्थापन करण्यासाठी अंदाजे तीन वर्षाचा कालावधी लागेल ,असे सांगण्यात आले होते । ही मूर्ती आपल्याला कोंडा रामास्वामी मंदिर एजीपुर , बेंगलोर येथे पाहण्यास मिळेल।

सर्व माहिती व फोटो आंतरजालतून.....

Saturday, December 21, 2019

छाया सोमेश्वर मंदिर,नालगोंडा,तेलंगणा

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

                          रहस्य भाग 2
           छाया सोमेश्वर मंदिर,नालगोंडा,तेलंगणा।
===+====+====+====+=======+====
या दुसऱ्या भागात मी तुम्हांला तेलंगणा राज्यातील नालगोंडा येथील छाया सोमेश्वर मंदिर येथे नेणार आहे।
        नावाप्रमाणेच हे मंदिर भगवान महादेवाचे आहे। याची आख्यायिका मध्ये एकदा भगवान शंकर व देवी पार्वती मध्ये खूप जोराचे भांडण झाले। त्यामुळे भगवान कैलाश पर्वत सोडून नालगोंडा येथे आले। थोड्या वेळाने देवी पार्वती त्यांना शोधत शोधत येथे आली। मग भगवान शंकरानी तिला आपल्या मागे सावली म्हणून जागा दिली।
          या मंदिरात देवी पार्वती सावलीच्या रुपात भगवान महादेव सोबत आहे। दिवसभर या पिंडीची सावली मागे भिंतीवर बरोबर मध्ये असते। आता तुम्ही म्हणाल की एखादा खांब मध्ये येत असेल की!
            मग ही आख्यायिका तयारच झाली नसती। देवाची मुर्ती व सूर्यप्रकाश मध्ये कोणताही खांब नाही। तरीपण ही मुर्ती ची सावली आहे। या मूर्तीच्या गाभारा मध्ये कायम अंधार असतो। त्यामुळे ही सावली स्पष्ट दिसते।तसेच ती सावली दिवसभर हलत नाही, हेही आजून एक वैशिष्ट्य!!!
           आता काहीजण दर्शन मंडप मधील प्रत्येक खांबाजवळ जाऊन आपली सावली आत येते का ते तपासून पाहतात। पण ती सर्व मेहनत वाया जाते। हे मंदिर साधारण 800 वर्ष्या पूर्वी बांधलेले आहे। हे बांधकाम चोल साम्राज्यात झालेची नोंद आढळते। मग 800 वर्षेपूर्वी हा चमत्कार कसा काय घडू शकतो। त्यावेळचे बांधकाम शास्त्र आजच्या पेक्ष्या प्रगत होते काय??
       उत्तर आहे हो नक्की ते प्रगत होते। कारण येथे जरी आख्यायिका असली तरी त्यामागे नक्की विज्ञान होते।त्यावेळी असलेले लोक प्रगत होते। फक्त त्यांचे ज्ञान आपल्या पर्यत पोचले नाही, हीच खरी शोकांतिका!!!
                  या सावलीचे रहस्य शोधून काढले होते ते भौतिक शास्त्रज्ञ मनोहर शेषगिरी यांनी। या सावलीसाठी एकूण चार खांब जबाबदार आहेत।
         यांनी सावली साठी दोन प्रकार मानले आहेत। पहिला प्रकार सरळ सूर्यप्रकाश एखाद्या वस्तूवर पडला असता तयार होणारी छाया । ही छाया हलणारी असते। हलणारी म्हणजे जसा सूर्य आपली जागा बदलेल तशी सावली पण आपली जागा बदलते। सकाळी सावली पश्चिम दिशेला असेल तर संध्याकाळी सावली पूर्व दिशेला।
          दुसरी छाया ही सूर्यप्रकाश च्या विकिरणा ने पडते। पण ही सावली आपली जागा बदलत नाही। कारण सूर्यप्रकाश किरण सरळ वस्तू ला अडत नाहीत। तर त्यांचे विकिरण होते। मगच वस्तू ला अडून त्याची छाया निर्मिती होते। सावली तयार होते। मग सूर्य कोणत्याही दिशेला असो। वस्तू ची छाया जागची हलत नाही। हाच धागा पकडून याची उकल झाली आहे।

मी घरी काढलेली आकृती। शास्त्रज्ञ मनोहर यांनी ही सुचवलेली आहे। मी फक्त drawing काम केले।


वरील आकृतीत मोठे ठिपके हे मंदिरातील खांब आहेत। पहिला किरणचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की, सर्वात कडेच्या खांबांची सावली आतील दोन खांबावर पडते। आणि त्या दोन खांबांची बरोबर मध्ये गाभाऱ्यात पडते। अश्या प्रकारे पहिली सावली तयार होते। आता दुसरा किरणा मुळे एक खांबांची सावली शेवटच्या खांबावर पडते। त्याची सावली गाभाऱ्यात पडते।  अश्याप्रकारे ती सावली दोन वेगवेगळ्या खांबांची आहे।आपण ज्यावेळी एक खांबाचा विचार करून सावली अडविण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी दुसऱ्या खांब आपले काम चोख बजावतो। व सावली जशी आहे तशीच राहते।
               आता शेवटचा प्रश्न ही सावली नाहीशी कशी होईल?? याची उत्तर वरील आकृतीतच आहे। आपल्याला ते दोन किरण बंद करावे लागतील। म्हणजे सावली नाहीशी होईल।
                 आता मंदिर कडे जाऊ। आपल्याला ते दोन किरण व तो खांब पहावा लागेल।






वरील दोन फोटोत आपल्याला ते दोन खांब व आत येणार प्रकाश दिसेल।आत कशी सावली आहे ते पाहू।

प्रकाश आत आला की सावली नाही दिसत।


मुख्य गाभारा असा दिसतो।


सावली अशी दिसते। जी कधीही बदलत नाही।




वरील तीन फोटोत मुख्य गाभारा , प्रकाश आत आला की नाहीशी होणारी सावली , सावली कशी आहे हे दिसतें।
               आपल्या पूर्वजाना प्रकाशाचे विकिरण 800 वर्ष आगोदर माहीत होते। हा त्याचा पुरावा। किती प्रगत स्थापत्यशास्त्र शास्त्र होते ते !!!

मुख्य मंदिर

आतील सावली अशी छान आहे।

🐋🐋🐋🐋🐳🐳🐳🐳

Saturday, November 30, 2019

भगवान दत्तात्रेय मंदिर,काला डुंगर,कच्छ, गुजरात।

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

                      रहस्य भाग 1

---------------------------------------------------  भगवान दत्तात्रेय मंदिर,काला डुंगर,कच्छ, गुजरात।
======+=+=====××××+==========                 

                       रहस्य भाग 1 हे सदर मी आजपासून लिहण्यास सुरुवात करतो आहे। आपण आपली प्रतिक्रिया नक्की सांगाल ही अपेक्षा व्यक्त करतो।
         गुजरात हे एक संपन्न राज्य आहे। तिथे बनवलेला statue of unity पाहायला आपण नक्की जात असतो।सुरत , बडोदा, अलाहाबाद ही आपली आवडीची ठिकाणे। आता एका नवीन ठिकाणाची त्यात भर घालायला तयार रहा।
         कच्छ हे वाळवंट पाहण्यासाठी काही निवडक पर्यटक जातात। कारण त्यांना काला डुंगर हा पर्वत व तेथील भगवान दत्तात्रेय मंदिर हे माहिती असते। साधारण कच्छ पासून 25 किमी दूर काला डुंगर हा पर्वत  आहे। या पर्वतावरून कच्छ वाळवंट हे विलोभनीय दिसते। या पर्वताच्या माथ्यावर आपले दत्त मंदिर आहे। या मंदिरापर्यंत आपली कार जाते, पण रस्ता अरुंद आहे। जाताना निसर्गाचा आनंद घ्यायला विसरायचं नाही। कारण हाच काय तो हिरवा भाग।
        कार पार्किंग ला लावल्यावर थोड्या पायऱ्या चढल्या की मंदिराचे दर्शन होते। मंदिरात जाण्यासाठी थोड्या पायऱ्या चढून जाव्या लागतील। प्रथम तुम्हाला सभामंडप चे दर्शन होईल। मग मुख्य गाभारा पाहायला मिळेल। तसे हे मंदिर 400 वर्ष जुने आहे ,असे म्हणतात। पण येथील रचना पहिल्या वर तो एक प्रश्न निर्माण करतो। गाभारा हा नवीन पध्दतीच्या सिमेंट कॉलम वर उभा आहे। छताला फारशी कलाकृती नाही। अगदी साधा आहे। खाली छान फारशी आहे । कदाचित ती संगमरवरी असावी।मुख्य गाभारा पण अगदी साधा असाच आहे। असे हे मंदिर। पण हे विश्व प्रसिद्ध आहे हे मात्र नक्की। गुजरात ला भेट देणारे कोणतेही परकीय या मंदिराला नक्की भेटी देतात। जवळच एक सन सेट पॉईंट आहे। हे कच्छ मधील सर्वात उंच पॉईंट आहे। याची उंची 458 मीटर आहे। येथूनच दिसणाऱ्या सूर्यास्त चे शब्दांत करणे जवळजवळ अशक्य आहे। खूप विलोभनीय, सुंदर, मनमोहक, मन प्रसन्न होणारे असते ।
              या मंदिराला भेट देण्याचे हे एकच कारण नाही। दुसरे महत्त्वाचे कारण आहे ,येथील लांडगे। जे तुम्हाला दिवस भरात कोठेही दिसणार नाहीत। अगदी हा काला डुंगर सगळा जरी पालथा घातला तरी! हे या मंदिराकडे दिवसातून फक्त दोनदा येतात। तेही प्रसाद घ्यायला!
       आता तुम्हाला वाटेल , की मांसाहारी प्रसाद असल्यावर ते येणारच। पण हा मांसाहारी नाही तर चक्क शाकाहारी आहे। तेही फोडणीचा भात ! मग लांडगे काय खाणार ?  खाणारच आणि त्यांनी खाईपर्यंत इतर कोणही खाणार नाहीत। अगदी मांजर, कावळे, इतर पक्षी सुद्धा नाही बरं!! त्यांचे झाल्यावर इतरांना परवानगी मिळते। आता तुम्ही म्हणाल हे खोटे आहे। नाही तर खरे आहे। हेच पाहण्यासाठी परदेशी पर्यटक येतात। त्यामुळेच हे मंदिर जगप्रसिध्द झाले आहे। आणि हे काम आजपासून नाहीतर मागील 500 वर्षांपासून अविरत चालू आहे। हेच पाहण्यासाठी आपल्याला तिकडे जायचे आहे।
          दुपारी व संध्याकाळी आरती झाल्यानंतर पुजारी ताटात खिचडी घेऊन लोंग प्रसाद ओटलो या चबूतऱ्यावर जातात। तिथे ती खिचडी ठेवतात। मग हातातलं ताट वाजवत मंदिराकडे येतात। पण येताना मोठमोठ्या ने म्हणतात लो अंग,  लो अंग। या वरूनच त्या चबुतऱ्या चे नाव लोंग प्रसाद ओटलो असे पडले आहे। मग कुत्री, कावळे, चिमणी, मांजर व इतर पक्षी येतात, पण ते त्या खिचडी ला आधी कधीच तोंड लावत नाहीत। थोडा वेळ होताच लांडगे येतात। ती खिचडी खातात। खाताने ते कधिच भांडण करत नाहीत। अगदी शांत पणे खातात। निघून जातात। साधारण पणे त्याची संख्या 40 च्या आसपास असते। मग इतर त्यावर तुटून पडतात। या लांडग्यांनि आजपर्यंत एकाही मनुष्य प्राण्यावर हल्ला केला नाही, हे विशेष। हे आपल्याला अर्थात लांबूनच पाहावे लागते।
             याची आख्यायिका अशी आहे....
    ज्यावेळी भगवान ध्यान लावून बसले होते। त्यावेळी तिथे एक लांडग्यांचा कळप आला होता। तो कळप खूप दिवसापासून उपाशी पोटी होता। जणू काही भगवान दत्तात्रय याची परीक्षा पाहत होता, की आम्हाला वाचवा। मग भगवान यांनी स्वतः शरीरातील मांस कापून त्यांच्यापुढे टाकले।त्यांनीही आवडीने खाल्ले। पण काय आश्चर्य त्याजागी कापलं तिथे नवीन मांस तयार !!! हे रुटीन पुढे बरेच दिवस चालले। आता भगवान तेथून जाणार होते। त्यामुळे त्यांनी एकेदिवशी खिचडी दिली। त्यांनीही आनंदाने खाल्ली। तेव्हा पासून ही परंपरा चालू आहे।

        याठिकाणी येण्याची आणखी काही कारणे.......
1.  भगवान दत्तात्रय यांचे मंदिर आहे। असे म्हणतात स्वतः भगवान दत्तात्रय यांनी इथे वास केलेला आहे।

2. येथील सन सेट पॉइंट होय। कच्छ मधील सर्वात उंच पॉईंट आहे। येथून भारतातील शेवटचा पूल दिसतो।

3. येथून बॉर्डर खूप जवळ आहे। फक्त 70 किमी। येथील दुर्बिणीतून पाहू शकता।

4. दुपारी व संध्याकाळी लांडगे खिचडी खाताना पाहणे अतिशय रोमांचक प्रसंग।

5. आजून एक महत्वाचे, येथील मॅग्नेटिक फील्ड । याठिकाणी आल्यावर याचा अनुभव घ्यायला विसारचे नाही। पर्वत चढताना एका विशिष्ट ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड लागते। त्याठिकाणी आपली कार बंद करायची व आश्चर्य पहायचे। तुमची कार पर्वत चढू लागेल। ते गुरुत्वाकर्षण नियमाच्या विरोधात!!! तेही 20 च्या स्पीड ने। विश्वास नाही, मग स्वतः अनुभव घ्या।

6. शेवटचं .....
      हे आपल्या भारतातील एकमेव ठिकाण आहे जेथून आपण चार बाबी पाहू शकता।
1. जंगल
2. पर्वत
3. वाळवंट
4. आणि समुद्र।

🐋🐋🐋🐳🐳🐳


भगवान दत्तात्रेय मंदिर, काला डुंगर।

खिचडी खाताना लांडगे।

खिचडी ठेवल्यावर पुजारी असे ताट वाजवतात, लो अंग लो अंग असे म्हणतात।

भगवान दत्तात्रेय मूर्ती।

Sunset point. It is about 548 mtrs high from sea level.. highest point in Kutch.

लांडग्यांच्या प्रतीक्षेत इतर 
Image source::: Google photo...

Wednesday, November 20, 2019

वालुकाशिल्प संग्रहालय, मैसूर।

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

            वालुकाशिल्प संग्रहालय, मैसूर।   
            ===++====+======+==============

                      मैसूर शहर हे संग्रहालय शहर म्हणून प्रसिध्द आहे, हे आधीच सांगितले आहे।
     येथे कोण कोणत्या गोष्टीचं संग्रहालय करेल याचा काही नेम नाही। अंदाज तर अजिबात येत नाही।
           आम्ही अगोदरच सी शेल संग्रहालय पाहिले होते। त्यानंतर खूप भूक लागली होती।जवळच हॉटेल असेल तर बरं होईल असे मनातल्या मनात मी म्हंटलं होतं। आणि झालेही तसेच रस्त्याच्या उजव्या बाजूस राधाकृष्ण हॉटेल होते। जरा बरे दिसत होते। बायकोला ते काही आवडले नव्हते। पण आजून शोधा शोध करायची म्हंटले तर एखादा तास नक्की जात होता। नंतर परत इथे यायचे होते। मग जाऊ द्या, म्हणून परवानगी मिळाली। आत गेलो तर बैठक व्यवस्था चांगली होती। फुल्ल थाळी ऑर्डर केली। जेवण बर होतं। बाकी काही खास चव वगैरे असं काही नव्हते। पण आमचा जवळजवळ दिड तास वाचला, याचे जास्त समाधान होते।
         गाडी त्याच पार्किंगला ठेऊन आम्ही चालत वालुकाशिल्प संग्रहालयकडे निघालो। आधीचे संग्रहालय डाव्या बाजूस व आताचे उजव्या बाजूस होते। अंतर फक्त चालत पाच मिनिटं!
              गेल्या गेल्या प्रथम तिकीट खिडकीत तिकीट काढले। तिकीट जास्त नव्हते। प्रौढ 40 रुपये, लहान 20 रुपये।
           आत गेल्यागेल्या प्रथम पाहायला मिळालं ती गणपतीची मुर्ती। तीही 15 फूट उंचीची। वाळू पासून तयार केलेली। अतिशय मनमोहक , सुंदर, विलोभनीय, शांत होती। मन प्रसन्न झाले। नाही म्हंटले तर सुरुवातिला चाळीस रुपये तिकीट जास्तच वाटले होते। पण ही मूर्ती पाहताच ते आठवलं पण नाही। मग एकेक शिल्प पाहताना दोन तास कसे गेले ते कळले सुद्धा नाही।
             यालाच चिटकून देवीचे शिल्प अजूनही लक्षात आहे। अगदी जशीच्या तशी मूर्ती! त्याच्या शेजारीच वाडीयार राजाचे शिल्प। राजा हत्तीवर आंबरीत आहे, असे शिल्प आहे। हत्ती अगदी हुबेहूब होता। त्यानंतर कृष्ण व अर्जुन यांचे शिल्प होते। यात असलेला रथ नक्की कॉपी केली की काय !इतका हुबेहूब। या शिल्पातील घोडे असे होते, जणूकाही मी खऱ्या घोड्यापुढे उभा आहे। तीच उंची, तोच रुबाब, तीच स्टाईल। पुढे मग सांता क्लोज, भगवान बुद्ध यांची शिल्प होते। त्यानंतर इजिप्त देशातील शिल्पे होती। उंट, ममी , घोडे स्वार पाहुन डोळे तृप्त झाले। आजून एक वैशिष्ट्य, तिथे एक राशी चक्र पण काढलेले होते। तेही सर्व राशी चिन्हां सहित! मग अरेबियन नाईट मधील प्रसंग होते। टॉम आणि जेरी पण होता। पाण्यातील जीव, सागरी जीव पण होते। हे सगळे पाहून मन हर्षुन गेले।
       मग थोडीशी चौकशी करावी वाटली। त्यावेळी हे संग्रहालय समजून घेतले। हे संग्रहालय साधारण 14000 Sq ft. म्हणजे चौदा गुंठे जागेवर आहे। यात 130 पेक्षा जास्त शिल्पे कोरलेली आहेत। याच्या एकूण 15 ते 17 थीम होतात।
                 यासाठी एकूण 120 ट्रक वाळू लागली। यासाठी वाळू, पाणी आणि अतिशय कमी प्रमाणात डिंक यांचा वापर केला आहे। या संग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणजे ही शिल्पे पाणी आणि प्रखर सूर्यप्रकाश यापासून सुरक्षित केलेली आहेत।तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या मुंग्या, किडे लागु नयेत म्हणून यावर कीड नाशक फवारणी करतात।
          या संग्रहालयाची संकल्पना गौरी मॅडम याची आहे। त्या देशातील अग्रगण्य वालुकाशिल्पकार आहेत। हे संग्रहालय म्हणजे त्याच्या सहा महिन्यांचे अपार कष्टाचे द्योतक आहे। हे संग्रहालय आठवड्यातील सर्व दिवस 9 ते 6 वाजेपर्यंत खुले असते।

🐋🐋🐋🐳🐳🐳









              

Friday, November 15, 2019

अंदमान-निकोबार येथे कायकाय पहाल ?

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

 ★★अंदमान-निकोबार येथे कायकाय पहाल ?★★

====+====+===================+=



                काल माझ्या ग्रुप वर अंदमान-निकोबार ट्रीप कशी करावी? यासंदर्भात विचारणा झाली। यासाठी हा लेखन प्रपंच......!
        आता या ट्रिपला जायचं म्हटलं की, सर्वप्रथम प्रश्न पडतो जाणार कसं ? 
                 यासाठी आपल्याला दोन मार्ग आहेत।  प्रथम मार्ग सागरी जलप्रवास। दुसरा मार्ग हवाईमार्ग।
               मुंबईतून प्रथम रेल्वेने चेन्नई येथे जावे लागेल । तेथून मग तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांच्या क्रुज मिळतील। त्यातून तुम्ही 70 तासात पोर्ट ब्लेअरला पोचू शकता । हा झाला समुद्री मार्ग ।
            आता हवाईमार्ग पाहू । आपल्याला मुंबईतून गो एअर व इंडिगो या दोन कंपन्या स्वस्तात नेऊ शकतात। साधारण जाण्याचे तिकीट आठ ते नऊ हजार दरम्यान असेल ।येण्याचे पण तेवढेच असेल।  मुंबईहून विमानाने निघाला तर सहा ते सात तासांमध्ये पोर्टब्लेअर पोचू शकतात। आपण आधीच ऑनलाईन बुकिंग केलेले असेल तर,  सरळ मुक्कामाला हॉटेलमध्ये जावे।
                दुसऱ्या दिवशी सकाळी प्रथम आपणास सेल्युलर जेल पाहायला जायचे आहे ।  1857 च्या उठावा नंतर इंग्रजांनी ही सेल्युलर जेल तयार केली। येथे ठेवण्यात येणाऱ्या कैद्यांना ही काळ्यापाण्याची शिक्षा होती।  कारण चारही बाजूंनी समुद्राने वेढलेली जागा...!   
            ज्यावेळी इमारत तयार केली गेली, त्या वेळेला सात वेगवेगळ्या इमारती होत्या। तसेच 696 सेल होते। स्वातंत्र्यानंतर फक्त आता तीन इमारती दिसतात।  इथे प्रत्येक कैद्याला पौंड 30 नारळाची किंवा मोहरीचे तेल काढावे लागत असे।  नाहीतर अमानुष मारहाण होत असे। ही इमारत तयार करायला त्यावेळी पाच लक्ष रुपये लागले होते ।या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर शेवटची कोठडी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आहे। तसेच तुम्ही कैद्यांना फाशी देण्याची जागा पण येथे पाहू शकता।येथील संग्रहालयात तो कोलहू, इतर त्रास देण्याची शस्त्रे पाहू शकता। अश्या प्रकारे आपण वेगवेगळ्या आठवणी मनात घेऊन बाहेर पडतो। या ठिकाणी आपल्याला संध्याकाळी 6:00 वाजता यायचे आहे। इथे एक साऊंड अँड लाईट शो आहे।याचे तिकीट50 रुपये आहे। 6 व 7:30 असे दोन शो असतात। एक हिंदी तुन व दुसरा इंग्रजी तुन असतो।ते पाहून मन तृप्त होईल।
        यानंतर आपल्याला अंथरपोलॉजीकल संग्रहालय पहायला जायचे आहे । हे संग्रहालय इथल्या वेगवेगळ्या जमातीच्या इतिहासाशी निगडित आहे। हे संग्रहालय 1975 साली सुरू झाले। येथे तत्कालीन जमातीचे कपडे, शस्त्र, कला, इतर कृती पाहायला मिळतात। एकदा आवर्जून भेट द्यावी असे ठिकाण...!
         या नंतर सागरी जीवजंतू ची माहिती देणारे सामुद्रिका संग्रहालय पहायचे आहे। वेगवेगळे सागरी जीव पाहुन मन खूश होऊन जाईल। त्यानंतर इथे एक अंदमान जमती ची माहिती देणारा एक शो आहे । तो पण पाहू शकता।
              या नंतर तुम्ही आजून एक संग्रहालय पाहू शकता। झुओलॉगिकल संग्रहालय होय। येथे तुम्ही वेगवेगळ्या प्रवाळची माहिती घेऊ शकता। या ठिकाणी वेगवेगळ्या स्पंज , फुलपाखरे, वेगवेगळ्या गोम पाहायला मिळतील। येथील मत्यसंग्रहालय मध्ये वेगवेगळ्या माश्यांच्या जाती पाहायला मिळतील।
         यानंतर तुम्ही पोर्ट ब्लेअरला आजून दोन बाबी पहायच्या आहेत। चॅथम सॉ मिल व महात्मा गांधी नॅशनल मरीन पार्क।
            येथून 5 किमी अंतरावर चॅथम बेटावर ही लाकडाची वखार आहे। 1883 साली ही वखार चालू झाली होती।परंतु दुसऱ्या महायुद्धात ती नष्ट झाली होती। त्यानंतर ही 1950 साली पुन्हा चालू केली। ह्या मिलचे एवढे महत्त्व आहे की, ही एकमेव आहे। येथे मिळणारे लाकडाला पदौक लाकूड म्हणतात। हा येथील राजवृक्ष आहे। तो 120 फूट उंच वाढतो। येथे याची वने पाहून मन प्रफुल्लित होते। हे लाकूड आपल्याकडील सागवानी लाकडापेक्षा मजबूत असते।  ही वने सर्व प्रकारच्या लाकडी वस्तू साठी लाकडाचा पुरवठा करतात। जसे इमारती लाकूड, बांधकाम लाकूड, शोभेच्या वस्तू साठी लाकूड।
             आता महात्मा गांधी पार्क कडे जावे लागेल। हे एकुण 15 बेटांचे मिळून बनलेले आहे। हे पोर्ट ब्लेअर पासून 30 किमी लांब आहे। हे उद्यान प्लास्टिक मुक्त आहे। त्यामुळे येथे बाटली बंद पाणी नेण्यासही मनाई आहे। येथे आपल्याला दोन माणसासाठी एक वॉटर बॅग मिळते। पण त्यासाठी 200रुपये डिपॉझिट द्यावे लागेल। आपल्या बाटल्यांतील पाणी त्यांत ओतून घेऊन त्या बॅगाच बेटावर नेऊ दिल्या जातात। बाटलीबंद पाण्याच्या बाटल्या वंडूरलाच सोडून द्याव्या लागतात। इथे होणारी प्लॅस्टिकच्या पिशव्यांकरताची तपासणी एवढी इत्थंभूत असते की काही व्यक्ती मुद्दाम किंवा चुकून आणलेल्या बाटल्या येथेच सोडून जातात किंवा जावेच लागते। येथून आपल्याला छोट्या होड्यांतून जॉली बॉय बेटाकडे जावे लागते ।बेट खरेच खूप सुरेखच आहे। अगदी दृष्ट लागण्यासारखे। या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे ही बोट खालून काचेची असते। मग त्यातून समुद्र पाहून मन तृप्त होते। खरे स्वर्गात असल्याची अनुभूती प्राप्त होते। याकरिता तिकीट मात्र 400 रुपये पडेल।
      वरील सर्व पाहे पर्यंत तीन दिवस संपतील। येथे आपले पोर्ट ब्लेयर पाहून संपते।
         यानंतर नंबर लागतो तो हॅवलोक बेटाचा। संपूर्ण दिवस लागतो येथे। हे अंदाजे 60 किमी लांब आहे पोर्ट ब्लेअर पासून। फेरीने यावे लागते। येथून जाण्यासाठी सकाळी 6 , 8 व 12:30 वाजता फेरी आहे। भाडे 1500 रुपये प्रति व्यक्ती जाण्यासाठी व येण्यासाठी 1500 रुपये प्रति व्यक्ती असते। येण्यासाठी 3 वाजता दोन फेरी आहेत व 4 वाजता एक फेरी आहे। यानंतर आपलीआपली सोय पहावी लागते। यांचे दर एवढे आहेत, तर स्वतंत्र दर किती ...?
बर असो। आशियातील सर्वात सुंदर बीच आपल्याला येथे राधानगरी पाहायचा आहे। यानंतर आपण आपला मोर्च्या वळवायचा तो एलिफंटा बीच कडे। येथे तुम्ही हत्तींना त्रैनिंग देताना पाहू शकता। यानंतर येथे दोन बाबीपैकी एक बाब आवर्जून करावी। एक स्कुबा ड्राइविंग किंवा सी वॉक । दोन्ही साठी 3500 रुपये लागतील। एकूण 7000 रुपये जातील दोन्हीसाठी। यात मला तर सी वॉक जास्त आवडते। तुम्ही जेव्हा समुद्रात उतरता तेव्हा 5 जणांसाठी एक ट्रेनर असतो। त्यामुळे घाबरून जायचे नाही।
         पाचव्या दिवशी तुम्ही रॉस आईसलँडला भेट द्यावी। याचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस बेट केले आहे। येथे तुम्ही the lone sailer memorial पाहू शकता। तसेच Netaji Subhas Chandra Bose Island Graveyard हे सुद्धा पाहू शकता।
             यानंतर बारतंग बेट पाहू शकता। या बेटावर चुनखडीच्या गुंफा खूप पाहण्यासारख्या आहेत। येथे छोटे छोटे ज्वालामुखी देखील पाहु शकता। जवळच पॅरोट आईसलँड आहे। तेथे फक्त पोपटाचे साम्राज्य आहे। येथील पोपटांना शेपूट लांब असते। खूप नयनरम्य देखावा असतो तो।
            अश्या प्रकारे हे 5 ते 6 दिवस होतात। फेरीने जाणे साठी 70 तास व येणे साठी 70 तास मिळून 140 तास होतात। साधारण 6 दिवस होतात। एकूण 12 दिवसाची ही ट्रिप होईल।
जाण्यासाठी योग्य वेळ फेब्रुवारीचे शेवटचे दोन आठवडे व मार्चचे पहिले दोन आठवडे योग्य आहेत। इतर वेळी गेलात तर पाऊस व वातावरण मुळे जाऊनसुद्धा हॉटेलमध्ये बसून राहावे लागेल।
     
🐋🐋🐋🐳🐳🐳
 


Saturday, November 9, 2019

सातारा येथे काय काय पहाल ?

❄❄❄❄❄❄❄❄❄

*सातारा येथे काय काय पहाल ? *
====================

1. *कास तलाव व बामणोली*

साता-यापासून पश्चिमेला यवतेश्वर मार्गे २७ कि.मी. अंतरावर समुद्रसपाटीपासून १४३० मी. उंचीवर कास पठार लागतो. या तलावात अनेक नैसर्गिक झरे असल्यामुळे बारामाही पाणी असते. या तलावातून सातारा शहराला पाणी पुरवठा केला जातो. या पठारावर जांभूळ, करवंदे, फणस, आंबा, हिरडा व अनेक दुर्मिळ औषधी झाडे अस्तित्वात आहेत. कासपासून फक्त १२ कि.मी. अंतरावर बामणोली हे निसर्गप्रेमिचे आवडते ठिकाण आहे. नौकाविहार करण्यासाठी उत्कृष्ट ठिकाण आहे.

2. *चाळकेवाडी व वनकुसवडे*

सातारा जिल्हा, ऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द पावला तो चाळकेवाडी व वनकुसवडे पठरावरील पवनऊर्जा प्रकल्पामुळे, ५० मीटर उंचीच्या मनो-यावरुन तीन पात्यांच्या विड टर्बाईनव्दारे वा-याच्या गतिज ऊर्जेचा वापर करुन विद्युत जनित्र फिरविले जाते. यातून पवन ऊर्जा निर्माण केली जाते. आशिया खंडातील सर्वात मोठा प्रक्ल्प येथे साकारला जात आहे. ८५७ पवन विद्युत जनित्रांच्या सहाय्याने ३१३ मेगावॅट वीज निर्माण केली जाते.

3. *ठोसेघर*

येथील धबधबे व सभोवतालचे निसर्ग समृध्द वातावरण यामुळे हे ठिकाण महत्वाचे पर्यटन केंद्र आहे. ठोसेघरचा मुख्य धबधबा ६०० फूट खोल दरीत पडताना पाहणे रोमांचकारक आहे. धबधबा पाहताना या ठिकाणी अनेक दुर्घटना घडल्या आहेत. या दुर्घटना थांडविण्यासाठी या ठिकाणी अलीकडच्या काळात निरीक्षण गॅलरी आणि संरक्षण तारेच्या भितींची सोय करण्यात आली आहे.

4. *माहुली*

कृष्णा व वेण्णा नद्यांच्या संगमावरील पवित्र क्षेत्र. माहुली येथे कृष्णा नदी गावाच्या मधून वाहते. त्यामुळे श्रीक्षेत्र माहुली व संगम माहुली असे गावाचे दोन भाग पडतात. याठिकाणी श्रीमंत शाहू महाराजांची समाधी आहे. यवतेश्वर व मंगळागौरी, राधाशंकर, बिल्वेश्वर,रामेश्वर ही मंदिर प्रसिध्द आहेत. पेशवाईत नावाजलेले न्यायाधीश रामशास्त्री प्रमुणे यांचे हे जन्मगांव. येथे शाहू महाराजांचा लाडका कुत्रा खंडयाची समाधी आहे व राणी ताराबाईचे स्मारक आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सायराबाई सती गेली. त्याचे स्मरण म्हणून नदीशेजारील वाळवंटात दोन शिलिगे स्थापन करण्यात आलेली आहेत.

5. *यवतेश्वर*

निसर्गरम्य परिसरात हेमाडपंथी शिवालय आहे. या डोंगराची समुद्रसपाटी पासून उंची १२३० मीटर आहे. डोंगराच्या उत्तर बाजूच्या टेकडीवर भैरोबाचे मंदिर आहे. त्यास पेढयाचा भैरोबा म्हणतात.

6. *पाटेश्वर*

पाटेश्वर हे स्थळ साता-यापासून ७ मैलाच्या अंतरावर आग्नेय दिशेस एका टेकडीवर आहे. पाटेश्वर हे ठिकाण मुख्यतः महादेवाच्या मंदिरासाठी प्रसिध्द आहे. मठ, मंदिरे, गुहा व मूर्ती हे पर्यटकांचे आकर्षण आहे. हे मंदिर पेशवेकालीन सावकारपरशुराम नारायण अनघळ यांनी छत्रपती शाहूंच्या कारकिर्दीत बांधले.

7. *सज्जनगड*

समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले ठिकाण. या ठिकाणी समर्थांची समाधी आहे. या किल्ल्याचे पूर्वीचे नाव परळी होते. हा किल्ला १६७६ मध्ये शिवाजी महाराजांनी जिकला होता. समर्थांच्या वास्तव्यामुळे परळीचे नाव सज्जनगड झाले. दास नवमीला येथे मोठा उत्सव असतो. गडावर सतत पाणी असणारी दोन तळी सुध्दा आहेत. अंगापूर डोहात सापडलेल्या मूर्तीचे आंगलाईचे मंदिर, पडकी मशिद, धर्मशाळा, समर्थांचा मठ, श्री. राम मंदिर व त्यांच्या तळघरात समर्थांची समाधी प्रेक्षणीय आहे. शेजघरात समर्थांनी वापरलेल्य वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये तांब्याचा मोठा हंडा, लोटा, कुबडी, गुप्ती आदी वस्तू त्याचप्रमाणे छ. शिवरायांनी समर्थांना भेट दिलेला पलंग पहावयास मिळतो. समर्थ रामदास महाराज ध्यानास बसत ती जागा रामघळ.

8. *धावडशी*

साता-याच्या वायव्येस असणारे धावडशी गाव ब्रम्हेंद्र स्वामींना १९२८ मध्ये छत्रपती शाहंकडूल इनाम म्हणून मिळाले होते. ब्रम्हेंद्र स्वामी छत्रपती शाहूंचे राजगुरु व पेशव्यांचे गुरु होते. सन १९४५ मध्ये ब्रम्हेंद्र स्वामी निवर्तल्यानंतर छत्रपती शाहूंनी त्यांच्या समाधीवर हे मंदिर बांधले. घ्मेरी झाशी नही दूँगीङ असे ठणकावून सांगणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई धावडशीच्या तांबे कुटुंबातल्याच. आज ही येथे त्यांच्या वाडयाचे अवशेष पहावयास मिळतात.

9.  *मर्ढे*

बा. सी. मर्ढेकर यांचे मूळ गांव. या गावात इ.स.वी सन १७०९ मध्ये छत्रपती शाहू महाराजांची छावणी होती. कृष्णा नदीच्या काठावरच सिघ्दामृत मठाची गढीवजा भव्य दगडी वास्तू उभी आहे. समर्थ रामदास स्वामींनी या मठाची स्थापना केली आहे. मठाचे तिसरे मठपती अमृतेश्वर यांनी पियुष रामायण कविताबध्द तसेच तत्वझाडा हा प्राकृत ग्रंथ लिहीला. पूर्वी या मठात सिध्दामृत विद्यापीठ होते.

10.  *शिवथर घळ*

समर्थांनी ज्या ठिकाणी दासबोध लिहला ते ठिकाण म्हणजे शिवथर घळ. भोर मार्गे महाडला जाताना वरंधा घाटाच्या अलिकडे शिवथर घळ लागते.

11.  *महादरे तलाव*

सातारा शहराच्या पश्चिमेला यवतेश्वर डोंगराच्या पायथ्याशी प्रतापसिह महाराजांनी हा तलाव बांधला.याची लांबी ८७ मीटर, रुंदी ८६ मीटर व खोली १० मीटर आहे. हा तलाव संपूर्ण घडीव दगडांनी बांधून घेण्यात आला आहे. या तलावाच्या दक्षिणेला हत्ती जलाव आहे.

12.  *कण्हेर धरण, कण्हेर*

सातारा तालुक्यात कण्हेर गावाजवळ वेण्ण नदीवर हे धरण १९७६ ते १९८८ मध्ये बांधण्यात आले. हे धरण मातीचे असून त्याची लांबी १३५५ मीटर आहे.

14. *सातारा*

अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी शाहू महाराजांनी बसविलेले ऐतिहासिक शहर १६९९ साली या शहरास छत्रपती शाहूंच्या राजधानीचा मान मिळाला.
अशी एकूण 14 पर्यटन स्थळे ही सातारा आजूबाजूला आहेत। आपल्या सोयीने यांचा क्रम लावून ही पहावीत।
आंतर जालातून साभार।


-------------------------------------
*सातारा शहर परिसरातील महत्वाची स्थळे*

=================

1. *अजिंक्यतारा*

सातारा शहराच्या दक्षिणेला असलेला मोठा किल्ला अजिंक्यतारा. अजिमतारा किवा मंगळाईचा डोंगर या नावाने ही ओळखला जातो. पूर्वी या किल्ल्यावरुन शहर व सभोवतालच्या विस्तीर्ण प्रदेशावर मावळे देखरेख करीत असत. या किल्ल्याच्या उतारावर शहराचा बराचसा भाग वसला आहे. शिलाहार वंशीय राजा दुसरा भोज याने ११९० मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला. १६९८ मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी सातारा ही मराठी राज्याची राजधानी जाहीर केली. आज या ठिकाणी मंगळादेवीचे मंदिर व पाण्याची सात तळी आहेत.

2. *चार भिती*

अजिंक्यता-यालगत असलेल्या टेकडीवर चार भिती येथे १८५७ च्या स्वातंत्र्य युध्दात आहुती देणा-या वीरांच्या स्मरणार्थ स्मारक स्तंभ उभारण्यात आला आहे. हा स्तंभ ३० फूट उंचीचा असून त्याभोवती चारी बाजुंना १० फूट उंचीच्या चार भिती व त्याभोवती छोटी तटबंदी आहे. या ठिकाणी झाशीची राणी लक्ष्मीबाई व प्रतापसिह महाराजांचे वकिल रंगो बापूजी गुप्ते यांचे अर्धपुतळे आहेत. स्तंभाच्या डाव्या बाजूवर १८५७ च्या धामधुमीतला हिदुस्तानचा नकाशा तर उजव्या बाजूला भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील ठळक घटना सालासहित दिल्या आहेत.

3.  *जुना राजवाडा*

छत्रपती प्रतापसिह महाराज (पहिले) यांनी हा वाडा बांधला. सध्या या वाड्यात जिल्हा परिषदेचे प्रतापसिह हायस्कूल सुरु आहे.

4. *नवा राजवाडा*

आप्पासाहेब महाराज यांनी जुन्या राजवाड्याला लागूनच नवा राजवाडा बांधला आहे. या वाडयात पूर्वी कोर्टाचे कामकाज चालत असते. सध्या इतर शासकीय कार्यालये आहेत.

5. *छत्रपती शिवाजी संग्रहालय*

या ठिकाणी दुर्मिळ ऐतिहासिक पुरातन वस्तुंचा संग्रह आहे. हे वस्तु संग्रहालय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत आहे. या संग्रहालयात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या व त्यांच्या घराण्यातील व्यक्तींनी वापरलेल्या वस्तु, साधने, शस्त्रे आणि पोशाखांचा संग्रह आहे. येथे भाले, कट्यारी, खंजीर, शिरस्त्राने, चिलखते,तलवारी, तोफगोळे, अंकुश, परशु, गुप्ती, धनुष्यबाण, किल्ल्याचा दरवाजा फोडण्यासाठी हत्तीकडून वापरावयाचेशस्त्र, सोनसळी,पडदे, गुप्तीचे प्रकार, रणशिग, जेडची मठ, बिचवा, पालखीच्या दांड्यावरील मानचिन्ह, वाघनखे, बंदुकांचे प्रकार, दारुच्या पुड्याचा शिगाडा, संगीनी, पिस्तुले इ. विविध प्रकारची युध्द साहित्य व साधने येथे मांडलेली आहेत. वस्त्र विभागामध्ये अंगरखा, जरिबुट्टीचे कपडे, साडया, पैठणी, फेटे, बख्तर,बाहू, आच्छादने, तुमान अनेक प्रकारच्या पगड्या, शेला, इ. समावेश होतो. या संग्रहालयामध्ये शिवाजी महाराजांची वंशावळ लावली आहे.

6.  *नटराज मंदिर*

दक्षिणात्य शैलीचे उत्तर चितंबरम हे चार गोपुरांचे मंदिर कृष्णानगर याठिकाणी आहे. शामराव शानभाग यांनी हे मंदिर स्वखर्चातून बांधले आहे. मूर्ती-प्रतिष्ठापना कांची पीठाचे अधिपती श्री. नरेंद्र सरस्वती यांचे हस्ते करण्यात आली. या मंदिरात नटराजाची पंचधातूची साडेचार फूटी उंचीची मूर्ती आहे. मंदिर समूहाच्या भेावताली चौकोनी आकाराची उंच तटभित आहे. या तटिभितीला चार मुख्य दिशांना प्रत्येकी पासष्ट फूट उंचीची चार गोपुरे आहेत. त्यांच्या बांधकामासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश सरकारने खर्च दिल्याने त्यांना त्यांची नावे देण्यात आली आहेत.

7. *श्री. कुरणेश्वर मंदिर*

पहिले बाजीराव पेशवे यांचे मेहुणे कृष्णाची चासकर यांनी १७२३ मध्ये हे दगडी मंदिर बांधले. शहराच्या पश्चिमेला परळीकडे जाताना बोगद्याच्या बाहेर १ मैलावर खिडीच्या गणपतीचे देवस्थान आहे. गणपतीची स्वयंभूमूर्ती असून कुरणेश्वर या नावाने ओळखली जाते.

8. *आयुर्वेदिक अर्कशाळा*

कै. डॉ. मो.ना. आगाशे यांनी स्थापन केलेली आयुर्वेदिक अर्कशाला लि. ही संस्था अनुभवसिध्द आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करते. या संस्थेची स्थापना १९२६ साली ८२ वर्षे अनुभव असलेली ही संस्था १२० ते १३० प्रकारची जुनी/नवी आयुर्वेदिक औषधे व शक्तीद्रव्ये तयार करीत आहेत.सर्वांना उपयुक्त अशी औषधे तयार करणारी अर्कशाळा साता-याचे भूषण आहे. हे ठिकाण म्हणजे पूर्वी तख्ताचा वाडा येथे होता. तेथे छत्रपतींचे सिहासन होते व दरबारही भरत असे.

9. *धननीची बाग शाहू बोर्डींग*

इसवी सन १९२४ साली सातारा शहरामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी छत्रपती शहू बोर्डींग हाऊस नावाचे छात्रालय सुरु करण्यात आले. कमवा व शिका या योजनेव्दारे स्वालंबनाचे आणि शिस्तीचे संस्कार या छात्रालयातील विद्यार्थ्यांवर केले जाऊ लागले.

10. *महानुभव मठ*

महानुभव पंताचे प्रणेते श्री. चक्रधर स्वामी आहेत. इ.स.१९१२ साली स्व. बाबा मोतीवाले यांनी या मळाची स्थापना केली. एकेश्वर वादाचा सिध्दांत हा महानुभावी पंथाचा मूलाधार आहे. या मठात नामस्मरण, चितन, मनन, पठण, चचग आदि भक्ती मार्ग अनुसरले जातात.

*शहरातील अन्य ठिकाणे*

प्रतापसिह उद्यान,शाहू उद्यान, भैरोबा मंदिर, गारेचा गणपती, पंचमुखी गणपती, ढोल्या गणपती, गोल मारुती मंदिर,फाशीचा वड, शाही मसजिद, अवर लेडी ऑफ हेल्थ चर्च, फुटके तळे, क्रांतीस्तंभ ही प्रेक्षणिय स्थळे आहेत.

🐋🐋🐋🐳🐳🐳