Friday, June 1, 2018

❄❄❄❄❄❄❄❄❄

*बार्शी लाईट रेल्वेची माहिती*

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰


भारतामधील काही जुन्या रेल्वे पैकी एक रेल्वे.....322 कि.मी. चा सगळ्यात लांब नॅरो गेजचा रेल्वे ट्रॅक....!!!!!

सन 1885....एक अवलिया इंग्रज इंजिनियर बार्शीत आला.....बार्शी.....त्यावेळेसचे मोठे व्यापारी गाव....इथुन व्यापार करण्यासाठी म्हणुन रेल्वे चालु करावी असे त्याला वाटले.....त्याने त्याच्या कंपनीला Survey ची परवानगी मागीतली....Great Indian Peninsula Railway ही ती मुळ इंग्रजी कंपनी....जिने भारतात आगीनगाडी आणली.....तिने त्या इंग्रज आधिका-यास परवानगी दिली.....सन 1887 रोजी.....

त्या इंग्रज इंजिनीयर ने Survey चालु केला.....बार्शी कुर्डवाडी रेल्वे चालु करण्यासाठी नविन कंपनी स्थापन करण्याची परवानगी GIPR कडे मागीतली.....ती त्याला मिळाली.....कंपनीचे नाव BARSI LIGHT RAILWAY......आणी त्या कल्पक, बुध्दिमान इंग्रज इंजिनीयर चे नाव *एव्हरार्ड काल्थराॅप* ......!!!!!!!

01/मार्च/1895 ला ही बार्शी ते कुर्डवाडी रेल्वे धावली.....पण एवढ्यावर थांबतील ते इंग्रज कसले....??

लातुर ........गुळ, कापुस, तेलबिया, खाद्यतेल.....याचा मोठा उत्पादक प्रदेश व अत्यंत सुरेख नियोजन असलेले आजच्या भाषेत Centralised Market Place.....सब माल एक जगह......!!!!

इंग्रजानी या काल्थराॅप महाशयाना सांगीतले ही रेल्वे लातुर ते मिरज करा......कारण पुढे मिरज हे प्रकिया उद्योगासाठी नावारुपास आलेले मोठे शहर होते.....

1911......लातुर मिरज ही नॅरो गेज रेल्वे चालु झाली...

हा एव्हरार्ड काल्थराॅर्प इंजीनियर रेल्वे जिनीयस म्हणुन ओळखला जातो....हा तसा आपल्या बहुचर्चीत लातुर पॅटर्न चा आद्य पुरुष......जनक......पुर्वी पुर्ण जगामध्ये जिथे कुठे नॅरो गेज रेल्वे होती तिथे दोन रुळातले अंतर हे 2 फुट होते .......जास्तीत जास्त मालवाहतुक करता  यावी म्हणुन याने सर्व अभियांत्रिकी कौशल्य वापरत ते 2 फुट 6 इंच केले....व ते यशस्वी झाले.....हा नॅरो गेजचा पँटर्न पुढे जगभर वापरला गेला.....हा 19 व्या शतकातला पहीला लातुर पॅटर्न होता.......

याच बुध्दिमान इंजीनियरने व्यापारी व मालवाहतुक करण्यासाठी ज्या रेल्वे सुरु करण्यात येतील त्या रस्त्याच्या कडेनच असाव्यात असे इंग्रज राज्याच्या गळी उतरविले.....म्हणुन ही रेल्वे कुर्डवाडी पर्यंत रस्त्याच्या कडेने होती...!!!!!

आपल्या मार्केट यार्डाकडे जाताना.....कदाचित ब-याच जणाना आठवतही असेल......आजच्या काथवटेंच्या हाॅटेल समोर अगदी दहावर्षापुर्वी रेल्वे रुळ होते.....ते थेट जुने गुळ मार्केट व डालडा फॅक्टरीत जायचे......कारण वाहतुक खर्च वाचावा व थेट रेल्वे आपल्या दारी.....झाले काय की लातुरची बाजारपेठ प्रचंड मोठी झाली....

1954 ला Indian Railway ने ही बार्शी लाईट रेल्वे कंपनी विकत घेतली.....!!!!!!!



🐋🐋🐋🐳🐳🐳


No comments:

Post a Comment